
मैत्री असो वा रिलेशनशिप… नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांचे विचार न पटणं हे साहजिकच आहे. कित्येक गोष्टींमुळे नात्यावर चुकीचा परिणाम होत असतो. त्यामुळे बरेचदा स्वतःला बदलावं लागतं. आपल्या जोडीदाराने समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे मग नात्यातील आनंद कमी होऊन चिडचिड वाढत जाते. कालांतराने एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ह्या कमी होऊ लागतात. पण मित्रांनो तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. आज आम्ही आपल्याला नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स अगदी शेवटपर्यंत नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी मदत करतील.
सतत जोडीदाराकडे लक्ष देऊ नका.

आपल्याला आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, तर त्या दिशेने पुढे पुढे जात राहावे. यामुळे तुमचं नातं देखील चांगले राहील. आपला संपूर्ण वेळ नात्यासाठी खर्च करू नका. थोडक्यात म्हणजे रिलेशनशिप मध्ये असताना वैयक्तिक विकास आणि येणाऱ्या संधींवर पूर्णपणे लक्ष द्यायला हवे. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाने आपल्या कामात बिझी राहावे.
रिलेशनशिप मध्ये एकमेकांचा सन्मान ठेवा.

नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांचा मान ठेवा. कारण आदर ठेवला नाही, तर कोणतेच नातं टिकू शकत नाही. म्हणून आपला जोडीदार सर्वात बेस्ट आहे, असे वेळोवेळी म्हणत त्याचे कौतुक करा. त्याच्यातील चांगल्या व वाईट गुणांना महत्त्व द्या.
मागील जुनं- नवं तिथेच सोडून द्या.

नातं म्हटलं की, थोड्याफार चुका या होतच राहतात. एकमेकांना समजून घेत संसाराची नौका पुढे नेणे, हेच तर खरं अवघड काम आहे. त्यामुळे ते ज्याला जमलं त्याने जग जिंकले. भूतकाळ तिथेच सोडून भविष्याच्या दिशेने वाटचाल करा. झालेल्या गोष्टी विसरून जाऊन नवीन गोष्टी आत्मसात करा.
रिलेशन मध्ये बॉन्ड तयार करा.

प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत आपल्या जोडीदारा चे मत घ्यायला विसरू नका. त्यानुसार जे कपल करतात, त्यांचे बॉन्डिंग नेहमी छान राहते. लहानसहान गोष्टींमध्ये पार्टनरचा सल्ला अवश्य घेत जा. असे केल्याने आपल्या जोडीदारासाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, हे दिसते.
एकमेकांना पर्सनल स्पेस द्या.

प्रेम मिळवणे, हे साधे सोपे काम नाही. त्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते. सतत कॉल, सतत मेसेजेस यामुळे बरेचदा चिडचिड होते. त्यामुळे नात्यात स्पेस मिळणे, हे खूप महत्त्वाचे असते. अन्यथा वादविवाद होत राहतात.








Add Comment